Mahatma Fule
साभार सकाळ

हे सगळे करतांना त्यांनी आपल्या घराचा, पत्नीचा कधीच विचार केला नाही. धर्म ही अफूची गोळी आहे या न्यायाने जोतीरावांनी सर्वसामान्य लोकांना सहज पचेल-रुचेल असा सत्यशोधक समाज नावाचा नवा धर्म काढून उच्च निचतेला तिलांजली दिली. इथला सामान्य माणूस धर्माच्या गुलामगिरीच्या पाशात घट्ट आवळला गेला होता. त्याला मुक्त करण्यासाठी आपला स्वतंत्र विचार त्यांच्या सत्यशोधक समाज यातून पुढे आला.
ही सगळी क्रांतिकारी कामे करतांना जोतीराव फुल्यांवर प्रतीगाम्यांनी अनेकवेळा हल्ले चढवले. लहूजी वस्ताद मांग यांच्या तालमीत दांडपट्टा, कुस्तीत तरबेज झालेले जोतीराव कोणत्याही शारीरिक हल्ल्याला घाबरले नाहीत. अनेकांचे हल्ले कधी शक्तीने तर कधी युक्तीने परतवून लावतांना त्यांनी सनातन्यांना सडेतोड प्रती उत्तर दिले.
सज्जनहो, आज आपण लोकशाहीच्या शंभरीकडे वाटचाल करत आहोत. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही म्हणून आपण आपली पाठ बडवून घेत आहोत. असे असले तरी आज देशाला कृतीशील महापुरुषांची नितांत गरज आहे. आज सगळीकडे स्त्री शिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली असली तरी ग्रामीण भागातील शिक्षणाचे प्रमाण म्हणावे तेवढे समाधानकारक दिसत नाहीत.
या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण २०२० लागू होत आहे. ते लागू झाल्यानंतर त्यातील साधक बाधक परिणाम आपल्यासमोर येतील. असे असले तरी छोट्या छोट्या खेड्यातील, वस्ती-वाडी-तांडा येथील शाळा बंद होता कामा नये. दहावी पर्यंतचे सक्तीचे आणि मोफत शिक्षण हे देशाला खऱ्या अर्थाने तारक ठरणारे आहे. शिक्षणाची गंगा गावागावातून प्रवाही असणे अत्यंत गरजेचे आहे.
एकीकडे विकासाची भाषा करतांना ग्रामीण भागात डोनेशन घेऊन इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांचे पेव फुटले आहे. असे झाल्यास गोर गरिबांना शिक्षण योग्य पद्धतीने मिळेल का? इतर सर्वच बाबी बरोबर शिक्षणाचे खाजगीकरण करणे कितपत योग्य आहे? छोट्या शाळा बंद करणे योग्य आहे का? याचा सरकारांनी विचार करून देशातील शिक्षण जोतीरावांच्या मार्गदर्शनात आजही पुढे न्यावे. असे होणे म्हणजेच जोतीराव फुल्यांच्या स्वप्नातील भारत उभे करणे होय! जय ज्योतीराव!
– प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये