Essay : MAHATMA JYOTIBA FULE

*महात्मा जोतिबा फुले निबंध*

महात्मा जोतिबा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते. ते जातीने माळी होते. त्यांचे वडील फुले विकण्याचा व्यवसाय करीत म्हणून त्यांना फुले असे आडनाव मिळाले.

Essay : MAHATMA JYOTIBA FULE महात्मा जोतिबा फुले निबंध*



               ज्योतिबा खूप हुशार होते परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण थांबवावे लागले. तेव्हा त्यांच्या शेजा-याने त्यांची हुशारी बघून त्यांना पुन्हा शाळेत घालण्यासाठी त्यांच्या वडिलांचे मन वळवले. मग १८४१ साली पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कुल शाळेत ते जाऊ लागले.
शिक्षणामुळे ज्योतिबांना आत्मभान आले. त्या काळात सर्वत्र उच्च जातींचे वर्चस्व होते. खालच्या जातीतील लोकांना अन्यायाने वागवले जात होते. त्या वर्चस्वाविरूद्ध ज्योतिबा फुले उभे राहिले. अनाथ हिंदू मुलांसाठी पहिला अनाथाश्रम त्यांनीच काढला.


फुले यांचा विवाह खंडूजी निवासी पाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला फुलांनी प्रथम आपल्या पत्नीला शिकवून पुण्यामधील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. थॉमस पॅनेचे ‘राईट्स ऑफ मॅन’ हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्या विचारात खूप बदल घडला. दलित आणि स्त्रियांनी शिक्षण घेतले तरच परिस्थितीत सुधारणा होईल असे त्यांना पटले. स्त्रियांना शिकवण्यासाठी त्यांनी पत्नी सावित्री हिला शिकवले. आणि मुलींसाठी शाळा काढली. सत्यशोधक समाज ही संस्थाही काढली. त्यांनी लिहिलेले ‘शेतक-याचा आसूड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
अशा ह्या महामानवाचे निधन २८ नोव्हेंबर, १८९० रोजी झाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *